महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत काल एका कार्यक्रमात एकत्र आले होते.
त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची गडकरी यांनी भेट घेतली होती. तेव्हा या भेटीचा आजच्या राजकीय घडामोडींवर काही प्रभाव पडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा..
दरम्यान या भेटीनंतर आज गडकरी पुन्हा एकदा नागपूर वरून मुंबई ला निघाले आहेत. त्या नंतर ते सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी काय पावलं उचलतील या कडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.