राज्यातील नऊ जिल्हे पूर बाधित- उपमुख्यमंत्री पवार

राज्यात सध्या सर्वदूर पाऊस सुरू असून राज्यातील नऊ जिल्हे पूर बाधित असून आतापर्यंत 73 नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Update: 2021-07-24 10:08 GMT

राज्यात सध्या सर्वदूर पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे मत तज्ज्ञानी व्यक्त केले आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते पुण्यात बोलत होते.

राज्यातील नऊ जिल्हे पूर बाधित

दरम्यान राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा नऊ जिल्यांमुना बसला असून, या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत 73 नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. सोबतच 59 नागरिक या पूरामध्ये बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे, तर 38 जण जखमी झाले आहे.

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात फटका बसला असून राज्यसरकार पूरग्रस्तांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

Similar News