देशभऱात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. दिवसाला सरासरी 90 हजारांच्या वर रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुढचे 4 आठवडे म्हणजे एक महिन्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य आणि केंद्र सरकारच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख व्ही.के.पॉल यांनी दिली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात रुग्णसंख्या आणि मृत्यदर अजूनही कमी आहे. पण हे प्रमाण वाढू नये यासाठी प्रयत्न करणे आणि काळजी घेण्याची गरज आहे. त्याकरीता लोकांनी आता कोरोनाचे नियम एक मोहीम म्हणून पाळण्याचे आवाहन पॉल यांनी केले आहे. महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, म.प्रदेश, गुजरात या 8 राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेतत. एवढेचत नाही तर या रुग्णांची संख्या देशातील आढळलेल्या रुग्णांच्या एकूण संख्येपाकी ८० टक्के आहे, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि पंजाबमध्ये केंद्राने 50 आरोग्य पथकं पाठवली आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही पथकं मदत करतील अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.