वसई मतदारसंघातील मतदारांची संख्या ३ लाख, २ हजार १५२ एवढी आहे.हा मतदारसंघ पूर्वीपासून बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९९० पासून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व या मतदारसंघावर आहे. बहुजन विकास आघाडीसाठी हा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. २००९ मध्ये वसई-विरार महापालिका स्थापन झाल्यानंतर यातून अनेक गावे वगळण्याचा मुद्दा चर्चेत आला.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा