सीएए, एनपीआर व ‘एनआरसी’संदर्भात सहा मंत्र्यांची समिती

Update: 2020-03-06 05:02 GMT

वादग्रस्त सीएए, एनपीआर व एनआरसी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ६ मंत्र्यांची समिती नेमण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. सीएए, एनपीआर व एनआरसी वरून देशभरात गदारोळसुरू आहे.

या विषयाबाबत अभ्यास करण्यासाठी अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय सहा मंत्र्यांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या समितीमध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.

“सीएए, एनपीआर व एनआरसी यासंदर्भात सध्या देशभरात जे संभ्रमाचे वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन याबाबतीत काय करणार असा प्रश्न अनेकजण विचारतात. नियुक्त करण्यात आलेली ६ मंत्र्यांची ही समिती या विषयांबाबत अभ्यास करेल. आवश्यकतेनुसार आणखी निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळात काय करायचे, पुढे निर्णय कसे घ्यायचे याबाबत ही समिती मार्गदर्शन करेल” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

Similar News