परिस्थिती गंभीर, सायबर सेल खंबीर | लॉकडाऊनमध्ये २१८ गुन्हे, ४५ अटक

Update: 2020-04-16 19:46 GMT

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार आणि समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून यासंदर्भात राज्यात २१८ गुन्हे दाखल झाले आहेत तर ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये २१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र आहेत. यात आक्षेपार्ह व्हॉट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 102 गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 71 गुन्हे, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 2 आणि ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय इतर सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी 38 गुन्हे दाखल झाले आहेत.

दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे बीड 26, कोल्हापूर 15, पुणे ग्रामीण 15, जळगाव 13, मुंबई 12, सांगली 10, जालना 9, नाशिक ग्रामीण 9, सातारा 8, नांदेड 7, परभणी 7, नाशिक शहर 7, ठाणे शहर 6, नागपूर शहर 5, सिंधुदुर्ग 5, नवी मुंबई 5, सोलापूर ग्रामीण 5, बुलढाणा 4, पुणे शहर 4, लातूर 4, गोंदिया 4, सोलापूर शहर 3, रायगड 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1,धुळे 1 यांचा समावेश आहे.

Similar News