भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या नेत्यांना पक्षात घेतलेलं चालतं तर मग आम्ही या दोन्ही पक्षांशी युती केली तर बिघडलं काय, असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपला (BJP) विचारलाय.
काँग्रेस-राष्ट्रवादीतते अनेक नेते भाजपात सामावून घेतले, तुमच्याकडे नेत्यांना शुद्ध करण्याची लॉण्ड्री आहे का?, असा सवालही त्यांनी विचारलाय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ही मुलाखत घेतलीये.