महाजनादेश यात्रा पुन्हा पुढे ढकलली

Update: 2019-08-14 06:57 GMT

पूरग्रस्त भागातील जनतेचा रोष, तसंच गणपतीची तयारी यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 17 तारखे पासून सुरू होणारी महाजनादेश यात्रा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही यात्रा 21 तारखेला सुरू होईल. 21 ते 31 ऑगस्ट असा या यात्रेचा दुसरा टप्पा असून यात ते 14 जिल्ह्यांमधील 55 विधानसभा असा 1839 किमी चा प्रवास करणार आहेत. या यात्रेत ते 39 जाहीर सभा आणि 50 स्वागत सभा घेणार आहेत.

महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सवानंतर सुरू होणार आहे. तिसरा टप्पा 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर असा असणार आहे. पूरपरिस्थिती आणि गणपती अशा दोन गोष्टी लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे.

Similar News