भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात ‘कलम ३७०’ या मुद्द्यावर प्रचार करत आहे. मात्र महाराष्ट्रातील पक्षांच्या अजेंड्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनांच्या मास्टरमाईंडला पकडण्याचा मुद्दा येत नाही. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला तरी पुरोगामी कसे म्हणावे? असा सवाल साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच कलाकारांनी व्यक्त केलाय.
मिलिंद पवार सांगतात, “सध्याच्या निवडणुकीमध्ये मतांचे मार्केटिंग सुरू आहे. एक व्यक्ती एक मूल्य हे लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला महत्व देणारे मूल्य आहे मात्र, हे मूल्य असणाऱ्या नागरीकास ग्राहक समजून त्याच्याकडील मत वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे वापरून विकत घेतले जात आहे.” असं ज्वलंत मतं सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहेत. पाहुयात त्यांनी काय म्हटलंय...
https://youtu.be/CTsu90X26pU