परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील 50 तासापासून घरी गेले नाही -पालकमंत्री ठाकूर

Update: 2021-11-16 06:12 GMT

अमरावती : अमरावतीतील हिंसक घटनांचा पार्श्वभूमीवर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील 50 तासापासून घरी गेले नाही असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. अमरावती शहरात दंगल झाली मात्र ,दोन्ही सामुदायाला शांत करण्यासाठी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना यश आलं आहे.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ह्या सातत्याने अधिकारी, पोलीस व नागरिकांसोबत बैठक घेत आहेत. दोन्ही समुदाय भडकले असतांना त्यांना शांत करण्यात त्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे अमरावतीत आता शांतता आहे, तर मागील 50 तासापासून मी जिल्हाधिकारी व रेस्ट हाऊसला बसून येथे बैठका घेत आहे. दोन दिवसापासून झोप नाही असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. सोबतच अमरावतीत दोन दिवसांपासून सर्वत्र शांतता आहे, त्यामुळे लवकरच सर्व पूर्वपदावर येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News