नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि पार्लेकर यांनी संतधार पावसाच्या आडोशात मुलाखत पार पाडली. यावेळी गडकरी यांनी आपल्या विकास कामांचा लेखाजोखा वाचुन दाखवला आहे, "संपुर्ण भारतात जोरात विकास कामे चालु आहेत. पायाभुत सुविधांचा विकास होतोय. फक्त महाराष्ट्रात एक लाख कोंटीची कामे सुरु आहेत. रस्त्यांचा दर्जाही चांगला आहे आणि त्याचबरोबर २०० वर्षा पर्यंत खड्डे पडणार नाही याची गॅरंटी आहे" असं मत गडकरी यांनी व्यक्त केलंय.
नव्याने लागू केलेल्या मोटार वाहन कायदा महसुल वाढवण्यसाठी नव्हे तरं लोंकाना अपघाता पासुन वाचवण्यासाठी हा कायदा आहे. भारतात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. दिड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. या कायद्याबद्दल भिती निर्माण होईल आणि अपघात देखील कमी होईल. असं मत नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.