गावी परतणाऱ्या मजुरांना सरकारचा मोठा दिलासा

Update: 2020-05-07 13:32 GMT

राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात परतण्यासाठी सरकारने विशेष रेल्वे सेवा सुरू केली. पण त्याआधी डॉक्टरचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याने राज्यात विविध ठिकाणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मजुरांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी या मजुरांकडून प्रमाणपत्रासाठी पैसे घेण्याचे प्रकारही घडल्याचा आरोप झाला.

त्यामुळे आता या मजुरांच्या सोयीसाठी त्यांची तपासणी सरकारतर्फे रेल्वे स्टेशनवर मोंफत केली जाणार आहे. गावी जाणाऱ्या मजुरांना डॉक्टराच्या पत्राची सक्ती करण्यात येणार नाहीये. सरकारने तसा आदेशच आज जारी केला आहे.

Similar News