मुंबईसह राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्या, सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ला पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या भागातील पावसाची स्थिती लक्षात घेता सरकारने या जिल्ह्यातील शाळा व कॉलेजना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. य़ा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.
All Government and Semi Government employees in MMR Region are allowed to report late on their duties.
Government also appeals people to stay safe at home if it is not necessary to go out.
All emergency services to function as usual.#MumbaiRainsLiveUpdate
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 4, 2019