सरकारी कर्मचाऱ्यांचा लेट मार्क माफ

Update: 2019-08-04 16:07 GMT

मुंबईसह राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्या, सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ला पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या भागातील पावसाची स्थिती लक्षात घेता सरकारने या जिल्ह्यातील शाळा व कॉलेजना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. य़ा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी उद्या दि.५ ऑगस्ट रोजी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन देखील राज्य शासनाकडून सूचित करण्यात आले आहे. उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

Similar News