अजब सरकार... गजब कारभार

Update: 2020-07-05 09:11 GMT

गुरूवारची बदली रविवारी रद्द झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली एका दिवसांत रद्द झाल्यानंतर आता उध्दव ठाकरे सरकारने दहा पोलीस उपायुक्तांपैकी आठ बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी दहा उपायुक्तांच्या बदल्या गृहविभागाने केल्या होत्या. त्यातील काहींनी आपापल्या पदाचा चार्ज ही सोडला. नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रूजू होण्याआधी मात्र, या उपायुक्तांना सरकारने नवीन धक्का दिला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या शिफारशींनुसार मुंबईतल्या उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबईतल्या बदल्यांची कल्पना सरकारला असतेच, मात्र सरकारमधील विसंवादामुळे उध्दव ठाकरे सरकारच्या निर्णय प्रक्रीयेचा गोंधळ आता चव्हाट्यावर आला आहे.

तीन पक्षाचं सरकार चालवताना सरकारमधला गोंधळ वारंवार समोर येत आहे. या आधीही या सरकारने आपले अनेक निर्णय फिरवले आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून सनदी तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं आणि त्या मागे घेणं असे निर्णय सरकार वारंवार घेत आहे. या मुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कामातील रस काढून घेतला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लवकरच सर्व प्रशासन ठप्प होईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगीतलं.

null

null

Similar News