डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकरणावर सामाजिक, राजकीय वर्गातून प्रतिक्रिया येत आहेत.
या घटनेनंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजगृहाला 24 तास सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. तसंच हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.