Video: कंगना रणौतच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले

Update: 2021-11-12 11:26 GMT

अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. काही लोकांनी तर तिचा पुरस्कार परत घेण्याची मागणी केली आहे. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तिने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे.

ती या व्हिडीओमध्ये म्हणते..

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. या वक्तव्यावरुन तिच्यावर टीका होत असताना आम्ही भाजप नेत्यांचं कंगना रणौतच्या या वक्तव्यावर त्यांचं काय मत आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी नक्की काय म्हटलंय पाहा...


Full View

Tags:    

Similar News