सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल असं भाजपला वाटत असेल तर असं त्यांनी ते गृहीत धरू नये असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलंय. सावरकरांवरचा प्रस्ताव चांगल्या मनाने स्विकारला जाईल असं बच्चू कडू म्हणाले.
भाजप महापुरूषांच्या नावावर राजकारण करत आहे. त्यांनी असं करू नये अशी आपेक्षा बच्चू कडूंनी व्यक्त केली. महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची ताकद भाजमध्ये नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला