“भगवा ध्वज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. म्हणजे तो त्यागाचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे जर कोणाला भगवा ध्वज पक्षाची मक्तेदारी वाटत असेल तर ते दुर्दैव आहे” असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
रयतेचं राज्य आणण्यासाठी, स्वयंप्रेरणेनं हा ध्वज पुढे आला आहे, असे कोल्हे यांनी म्हटले. परभणी जिल्ह्यातून राष्ट्रवादी शिवस्वराज यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली होती, त्यावेळी कोल्हेंनी पत्रकारांच्या प्रश्नावर भगव्या झेंड्याबद्दल स्पष्टीकरण दिले.