नांदेडच्या शेतकऱ्यांकडून उभ्या पिकात काळे झेंडे लावून सरकारविरोधी संताप.

Update: 2024-03-26 08:25 GMT

Nanded : आपल्या शेतजमीनीतून जात असणाऱ्या महामार्गाचा सरकारकडून योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट शेतीच्या बांधावरून राज्य व केंद्र सरकारचा विरोध केलाय. ज्यात अर्धापूर तालुक्यांतील उमरी, मालेगाव, देलुब, कांचननगर, अर्धापूर येथील शेतकऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवत थेट उभ्या पिकात काळे ध्वज अथवा झेंडे लावून सरकार विषयी संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केलाय.

दरम्यान नांदेड जिल्ह्यांतील अर्धापूर तालुक्यातून शक्ती पिठ महामार्ग जात आहे, ज्या महामार्गाला उमरी, देळुब, मालेगाव, अर्धापूर, कांचननगर, असेगाव या गावातून विरोध होताना पाहायला मिळतोय. कारण सदर राष्ट्रीय महामार्ग ज्या शेतजमिनीतून जात आहे, त्या शेतकऱ्याना मिळणारा मोबदला हा पाचपट मिळण्या ऐवजी, केवळ दुप्पट मिळत आहे. कारण बाजार मुल्या पेक्षा हा मोबदला फार अत्यल्प आहे. त्याच प्रमाणे एक तर मिळणारा मोबदला कमी व सदर परिसरातील शेतकरी हे अल्पभूधारक असुन या महामार्गामुळे बहुतांश शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे सदर राष्ट्रीय महामार्गाविषयी संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन सूरू केलंय. ज्यात लोकसभा निवडणूक काळातील आचारसंहितेचा विचार करून या शेतकऱ्यांनी चक्क केळी, ऊस, हळदीच्या उभ्या पिकात काळे झेंडे लावुन गांधीगिरी केलीय.

Tags:    

Similar News