अमरावतीत आंबेडकर कमानीचा वाद उसळला; पोलीस आणि आंदोलक आमने-सामने

आमरावतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कमानीला नाव देण्यावरून चांगलंच प्रकरण तापलं आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यावरून दोन गट आमने-सामने आले.

Update: 2024-03-11 14:25 GMT

Amravati News Update | आमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला. पांढरी खानापूर येथे प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यावरून दोन गट आमने-सामने आले.


याच मुद्द्यावरून आज मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येत तिव्र आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेले आंदोलक थेट विभागीय आयुक्तालयाच्या कार्यालयात घुसले. पोलीस आणि आंदोलका यांच्यात संघर्ष झाला.

एका महापुरुषाच्या नावाचं प्रवेशद्वार गावात उभारावं, अशी मागणी गावकऱ्यांची होती. ग्रामपंचायतीत मध्यंतरी याबाबत ठराव देखील झाला होता. पण काम होत नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला होता. त्यानंतर हजारो नागरीकांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं.

आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तीन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांची भेट घेतली होती. प्रशासनाकडून तीन दिवसांचा वेळ मागण्यात आला होता. त्यानुसार सकाळपासून आंदोलकांची बैठक सुरु होती. या दरम्यान आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी विभागीय आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीसांनी आंदोलकांना अडवलं आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. आंदोलकांकडून दगडफेक झाली तर पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर पोलीसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमलेल्या जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Tags:    

Similar News