आज विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्याचा कृषी क्षेत्राचा विकासदर वाढल्याचं दिसून येतं, गेल्या वर्षी फडणवीस सरकारच्या काळात कृषी क्षेत्राचा आर्थिक विकास दर उणे २.२ टक्के होता. यामध्ये या वर्षी ३.१ टक्क्यांची वाढ झाल्याचं आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे राज्याचा आर्थिक विकास दर घटलेला असताना राज्याला शेतकऱ्यांनी दिलासा दिल्याचं दिसून येतं.