राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अहवालानुसार राज्यातील 3.7 टक्के लोकसंख्या बेघर असल्याचं समोर आलं आहे. देशाचा चा विचार केला तर देशातील 3.9 टक्के लोकांना स्वत:चं घर नाही. 2001 च्या जनगणनेच्या तुलनेत 2011 च्या जनगणनेचा विचार केला तर बेघरांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येतं.
मात्र, राज्यातील बेघरांची संख्येत म्हणावी अशी घट झाल्याचं दिसून येत नाही.