हिंदीची सक्ती केली तर देशाचे तुकडे होण्याची भीती – कुमार केतकर

Update: 2022-04-27 14:12 GMT

भाजपला स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित सर्व गोष्टी संपवायच्या आहेत, त्यामुळेच दिल्लीत सेंट्रल व्हिस्टाची निर्मिती करण्यात आली आहे, त्यामुळे काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला जातो आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केली आहे. सर्वोदय संकल्प पदयात्रे दरम्यान कुमार केतकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पण याचवेळी हिंदीची सक्ती केली तर देशाचे तुकडे होण्याची भीती आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. भारत हा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देश आहे, त्यामुळे या देशातील विविधतेली एकतेला धक्का लागता कामा नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


Full View

Tags:    

Similar News