राज्याच्या राजकारणात सध्या धार्मिक मुद्द्यावरुन तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरसभांमध्ये सनातन धर्म की जयच्या घोषणा देण्यास सुरूवात केली आहे. तिकडे राज ठाकरे यांनी भाजपची री ओढत मशिदींवरील भोंग्यांचा विषय उकरुन काढला आहे. राज ठाकरेंना गांभीर्याने घ्यायचे नाही असे म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या सर्व आरोपां ना उत्तरं दिली, एवढेच नाही तर आपण नास्तिक नाहीत, हे देखील त्यांना सांगणे भाग पडले आहे....यासर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे ते सांगणारा रिपोर्ट....