राज्यातील भटक्या - विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे असा आरोप ओबीसी नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केला आहे.
मागच्या आठवड्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या शिष्टमंडळाने भटक्या आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, अद्यापपर्यंत सरकारने या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचं मत आमदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलं. भटक्या समाजाच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात परराज्यातील लोकांची घुसखोरी होत असून यालाही आपली शासकीय यंत्रणा कारणीभूत असल्याचा आरोप आमदार राठोड यांनी व्यक्त केला आहे.