2019 च्या लोकसभा निवडणुकीत युवकांचे मतदान महत्वाची भूमिका निभावतील. कारण या निवडणुकीत साधारण मतदारांपैकी 12 ते 14 टक्के मतदान हे युवकांचे असणार आहे. भारताच्या एकूण मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांची टक्केवारी पाहिली तर यामध्ये युवकांचे प्रमाण निश्चितच अधिक असणार आहे.
त्यामुळे सुशिक्षित असणाऱ्या तरुण आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकणार. यावरुन या निवडणुकीचा कल ठरु शकतो. या सर्व बाबींचा विचार करता या निवडणुकीमध्ये युवक कुणाला मतदान करतात हे महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे काय आहे युवकांच्या समस्या आणि युवकांच्या मतांचा भारतीय निवडणुकांवर कितपत प्रभाव पडेल या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांचे विश्लेषण...
https://youtu.be/RLG3JEB5KB4