देशात सध्या लोकसभेच्या निवडणूका सुरु आहेत. त्यामध्ये शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या सारख्या मुद्यांवरुन विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच बेरोजगारीच्या मुद्यावरुन भाजप बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे. त्यातच ‘सीएमआयई’च्या आलेल्या अहवालात भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या पहिल्या तीन आठवडय़ांत ८.१ टक्क्यापर्यंत पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे ‘सीएमआयई’ ने दिलेल्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.
कसा ठरवला जातो दर?
बेरोजगारीचा दर एप्रिलच्या पहिल्या तीन आठवडय़ांत ८.१ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. देशातील कुटुंबाची पाहणी करून तो ठरवण्यात आला असून गेल्या अडीच वर्षांतील बेरोजगारीच्या दराचा हा उच्चांक असल्याचं या अहवालावरुन समोर आलं आहे.