धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही म्हणणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घुमजाव केले आहे. त्यांना दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहता येत नाही. यांचा हा खेळ सत्तेसाठी आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
पंकजा मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही अशा सांगत होत्या आणि आता त्यांनी घुमजाव केले आहे. आज त्या मंत्रालयात आल्या त्यावेळी लोकांनी विचारले असता मी २०१९ला सत्ता मिळाल्यानंतर आरक्षणाबाबत बोलले असं त्या म्हणाल्या. याचा अर्थ या दोन दिवसपण सत्तेपासून हे दूर राहू शकत नाही. ही परिस्थिती आज आहे. यांचा हा खेळ सत्तेसाठीच आहे असेही नवाब मलिक म्हणाले. राज्यात जेव्हा कधी निवडणूका होतील त्यावेळी लोकसभेत आणि विधानसभेत भाजपाला धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.