आज भारतीय वैज्ञानिकांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मोठी कामगिरी करत 300 किमी. अंतराळातील सॅटेलाईल मिसाईलने पाडला. यामुळे अशी शक्ती असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया, चीन नंतर चौथा देश आहे. ज्या देशाकडे अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे.
काय म्हटलंय मोदींनी...
LEO लाईव्ह सॅटेलाईटला भारताने मारलं आहे, भारताचं हे मोठं यश आहे, केवळ तीन मिनिटात हे यश मिळालं. भारताने अवकाशात 300 किमी अंतरावरील सॅटेलाईट पाडलं, 3 मिनिटात ऑपरेशन यशस्वी झालं, असं मोदी म्हणाले.
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करुन आपण देशाला महत्त्वाची माहिती देणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर मोदींनी 12 वाजून 24 मिनिटांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती देशासह जगाला दिली.