विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने विनायक होगाळे लिखित 'ओह माय गोडसे' या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी कायदे अभ्यासक असीम सरोदे, संपादक मनोहर सोनावणे आणि लेखक विनायक होगाळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सुभाष वारे होते. वृत्तवाहिन्यांनी महात्मा गांधी नायक की खलनायक हा कार्यक्रम करावा, खलनायक म्हणून सांगितले, तरी गांधी नायक म्हणून पुढे येत राहतील. गांधी कधीच कालबाह्य होऊ शकत नाहीत.असीम सरोदे म्हणाले, 'भाजप गांधींवर हक्क सांगत आहे. यातच बदल दिसत आहे आता गांधींना संत स्वरूपात नव्हे, तरक्रांतिकारी रूपात पुढे आणण्याची गरज आहे.' महात्मा गांधींची गाथा ही प्रयत्नांची गाथा आहे.