मुंबईसारख्या महानगरामध्येही इमारतींबरोबर बीडीडी सारख्या चाळी शेवटची घटका मोजत आहेत. सरकारनं चाळीतल्या रहिवाशांचं जनमत मिळवण्यासाठी पुनर्वसनाची आश्वासनं दिली. मात्र ती आश्वासनं आजतागत पूर्ण झालीच नाहीत. या बीडीडी चाळीनं अनेक लढे पाहिले हे ऐतिहासिक कल्चरच संपतंय का, अशी भीतीच आज बीडीडी चाळीतील लोकांना वाटू लागलीय. त्याच बरोबर मराठी टक्का कमी होण्याचा धोका सुद्धा प्रकर्षाने जाणवत आहे.
बीडीडी चाळीतील लोकं जीव मुठीत धरून राहतात. राज्य सरकारनं बीडीडी चाळीच्या पुनर्वसन योजनेचा नारळ देखील फोडला. मात्र, प्रत्यक्ष पुनर्वसनाची हालचाल सुरू झालीच नाही. स्थानिकांना अजूनही संक्रमण करार काय आहे, हे माहित नाही. लोकांना सरकारनं अजूनही याबाबत विश्वासात घेतलेलं नाही. बीडीडी चाळीतील लोकांमध्ये राजकीय नेते मुंबईतून आम्हांला बाहेर काढू पाहतायेत, अशी भीती निर्माण झाली आहे.
https://youtu.be/ydkl6shqcgQ