शिवसेना भाजप यांची युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड आहे कोणीही, तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ही युती केवळ सत्तेसाठी नाही, ही युती विचारांची आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी युतीवर टीका करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षात सरकारने केलेली काम जनतेला सांगितले.. युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.