हा आपल्या राज्याला लाभलेला अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे - उध्दव ठाकरे

Update: 2024-02-10 12:03 GMT

हा आपल्या राज्याला लाभलेला अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे - उध्दव ठाकरे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुंडांचा जो हैदोस सुरू आहे, हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. काल रात्री जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण आणि कालच्या निखिल वागळे, विश्वंबर चौधरी व आसीम सरोदे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी परखड भाष्य केलं आहे.

यावेळी त्यांनी राज्याचं गृहमंत्रीपद सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच लक्ष्य केलं. शिवाय, घोसाळकरांवर खरंच मॉरिसनं गोळी झाडली की आणखी कुणी? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. उध्दव ठाकरे बोलताना पुढे असं म्हणाले की, जर फडणवीसांवर असा कोणता प्रसंग ओढवला, माझी इच्छा नाहीये की तसं काही व्हावं, पण झालंच तर फडणवीसांची भूमिका काय असेल? हे गृहमंत्री आपल्या राज्यात जनतेचं संरक्षण करू शकत नाहीत जनतेचं काय संरक्षण करू शकणार आहेत, आणि कुत्रा गाडीखाली मारण्याची भाषा करणारा या राज्याचा गृहमंत्री कसा असू शकतो.  कुत्रा तर इमानदार असतो. पण हे गृहमंत्री कोल्ह्यासारखे आहेत, हा आपल्या राज्याला लाभलेला अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे, असंही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. 

Tags:    

Similar News