आघाडी सरकारची तिजोरी ठेकेदारांची ; भाजप युती सरकारची तिजोरी जनतेची- सदाभाऊ खोत

Update: 2019-11-03 16:18 GMT

पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीची पहाणी केली.यावेळी खोत यांनी “शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर विरोधकांनी टीका करण्याऐवजी शेतकरी संकटात असताना एकत्रितपणे सोबत काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.” अशी भावना व्यक्त केली आहे.

हे ही वाचा..

“राज्य सरकारची तिजोरी ही सामान्य जनतेची असून त्यावर अधिकार घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे. आघाडी सरकारच्या काळातील तिजोरी ही ठेकेदारांची होती मात्र भाजप सरकारची तिजोरी ही जनतेची आहे” अशी टीका त्यांनी केली आहे.

 

Full View

Similar News