कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित असतानाही, उद्योगपती वाधवांना नियम धाब्यावर बसवून मुंबईहून साताऱ्याला जाण्यासाठी शिफारसपत्र दिलं. हे शिफारस पत्र देणाऱ्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवलं असलं तरी त्यांच्यावर कारवाई कधी होणार?
सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून उद्योगपती वाधवांना शिफारसपत्र देण्यात आलं हे उद्योगपती वाधवा नक्की आहेत कोण? यांच्यावर कोणत्या कोणत्या राजकीय पक्षातील नेत्यांचा हात आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्रचे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांचे रोखठोक विश्लेषण