देशात अलिकडे मॉबलिंचिकचे प्रकार वाढत आहे. यामागे विशिष्ट शक्ती अनेक वर्ष पडद्यामागे काम करत आहेत. या पडद्यामागील शक्तींचा वेध घेणारा डॉ. बापू चंदनशिवे यांचा लेख
खरं तर या देशामध्ये झुंडीने एकत्र येऊन लोकांना मारणे काही नवीन नाही. विशेषतः मागील पाच- सहा वर्षात हे प्रमाण अधिकच वाढले. काहींना ठरवून मारले, तर काहींचे जात, धर्म याचा सहारा घेत खून केले. समूहाने मारले, की कोणी मारले हे कळत नाही.
जात- धर्म- वर्ण- राजकीय दहशत, सामंतशाही वृत्ती, यामुळे अनेकांना आलेला माज, मग्रुरी आणि अतीव घमेंड हे झुण्डशाहीचे प्रेरक घटक आहेत.