''पवार साहेबांचे महाराष्ट्रासाठी काय योगदान..'' - नारायण राणे

Update: 2022-11-29 14:58 GMT

सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्त्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यांनी हिंदुत्त्वाशी गद्दारी केली. त्यामुळे आता त्यांना हिंदुत्त्व हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन सावरकरांचा अपमान केला. म्हणूंनच आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना मिठी मारून कानात वेल डन बोलले असतील. यावेळी बोलताना राणे यांनी शरद पवार सीमाप्रश्नावरून जास्त बोलायला लागले आहेत.

महाराष्ट्रातील एक इंचही जागा कोणालाही देऊ नये, हेच भाजप पक्षाचे ठाम मत आहे. त्यामुळे पवारांच्या मताला फार किंमत नाही. पवार साहेबांचे महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे, हे जनतेला माहिती आहे. असं म्हणत पवारांवर देखील टीका केली. आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले...


Full View

Tags:    

Similar News