आरक्षणाचं झालं काय? वैदू समाजापर्यंत आलंच न्हाय !

Update: 2024-01-07 20:13 GMT

वर्षानुवर्षे जंगलाती दरीखोऱ्यात धुंडाळत त्यातील जडीबुटी गोळा करून गावोगाव जाऊन आयुर्वेदिक औषध विक्री करणारी भटकी जमात म्हणजे वैद्य अथवा वैदू समाज होय. कधीकाळी आयुर्वेदाला देशभरात महत्व होते त्यामुळे लोकांचा कल हा मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाकडे होता. पण काळाच्या ओघात व बदलत्या जीवनशैलीमुळे आयुर्वेदापेक्षा अँलुपॅथीकडे लोक वळले आणि वैदू समाजाच्या हातचा रोजगार गेला. पुरातन काळापासूनच आयुर्वेदिक जडीबुटी घेऊन देशोदेशी फिरणारा हा भटका समुदाय या फिरस्ती जीवनमानामुळे स्थैर्य मिळवू शकला नाही. त्यामुळे वैदू समाजातील नागरिकांना स्वतःची घरे, शेतजमीन, शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्थैर्य कधी मिळालच नाही.



Full View




Tags:    

Similar News