Corruption in Road Projects : भ्रष्टाचाराची खाण, देशातील रस्ते- फ्लायओवर्स !
मुंबई-पुणे हायवेवरील वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्याच्या बांधणीपलिकडील वास्तव म्हणजे अवाढव्य पैशांचा भ्रष्टाचार... कसा होतो सांगताहेत अस्सल मुंबईकर...
X
Mumbai-Pune Expressway ४८ तास मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद होता - हजारो गाड्या बंद - महिलांचे आणि मुलांचे हाल इतके झाले असतील की त्याची कल्पनाच करवत नाही. आणि या सरकारचा एकही मंत्री तिथे फिरकला नाही. एक निवडणुक झाली की दुसरीच्या तयारीला लागायच! जिथून मिळेल तिथून पैसा ओरबाडायचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात नेते मग्न आहे. ज्यांचा जन्मात सायकल सुध्दा घेता येणार नाही अशी परिस्थिती होती त्यांच्याकडे आज दहा दहा मर्सिडिज गाड्या आहेत! चार पाचशे कोटीचा जमाना गेला; आता दहा दहा हजार कोटींची माया गोळा झालेली आहे!
रस्ते- फ्लायओवर मध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आहे! आपल्या सारख्या सामान्य मूर्ख माणसांना वाटत आपली गाडी भरधाव जाते म्हणजे देशाची प्रगती होतेय!
मी काल कोल्हापूरला जाताना - सातारा ते कोल्हापूर रस्त्यावरील रखडलेली कामे बघितली त्या आधी मुंबई-गोवा का रखडला हे देखील बघितल तर एक लक्षात येईल की कित्येक ठिकाणी काहीच कारण नसताना दोन दोन किलोमीटरचे फ्लायओवर्स अर्धवट बांधून ठेवलेले आहेत. इतका प्रचंड संताप होत होता की काय चाललंय या देशात हेच कळत नाही. मी अगदी जबादबारीने सांगतो जर एक चांगली टेक्निकल चौकशी नेमली तर देशभर असे कित्येक फ्लायओवर्स आणि सीमेंटचे रास्ते काहीच कारण नसताना बांधण्यात येत आहेत. आणि वेळेवर होणार नाही असा जाणीव पूर्वक प्रयत्न असतो; म्हणजे वाढीव कामाच कंत्राट वाढवणार (आणि हे वेळ नेमकी इलेक्शन आले की येते - म्हणजे पैसा कुठे जातो हे लक्षात येईल).
देशात अजुनही प्रचंड गरीबी आहे! लोक कसेबसे जगण्याचा प्रयत्न करतात. दिवसाला १२ ते १४ तास काम करून आपल्या मुला-बाळांच पोट भारतात. आणि राजकीय नेत्याकडे किमान दहा ते पंधरा पिढ्या घरी बसून फाइवस्टार मजा करतील अशी संपत्ती आहे!! मी शाप देत नाही पण या लाखों मजूर/ शेतकरी / कष्टकरी गरिबांच्या रक्ताचे पाणी होत आहे; त्यांच्या मेहनतीवर देश चालतो. रोज देश लुटणाऱ्या दोन चार उद्योगपतीं मुळे नाही! ज्या हजारो लाखों लोकांच्या बलिदानांमुळे देश स्वतंत्र झाला त्यांची हाय यांना लागल्याशिवाय रहाणार नाही. उद्या तुमच्या पुढच्या पिढ्या मतीमंद, आंधळ्या, लुळया आणि पांगळ्या निघाल्या तर हा पैसा काही कामी येणार नाही! हे लक्षात ठेवा.
आपला अस्सल मुंबईकर






