Home > Top News > Mumbai-Pune Expressway Traffic Jam : वाहतूक अद्याप सुरळीत नाही, पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे केले आवाहन !

Mumbai-Pune Expressway Traffic Jam : वाहतूक अद्याप सुरळीत नाही, पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे केले आवाहन !

Mumbai-Pune Expressway Traffic Jam : वाहतूक अद्याप सुरळीत नाही, पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे केले आवाहन !
X

Mumbai-Pune Expressway Traffic Jam १५ तासानंतरही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ठप्प वाहतूकीमुळे अडकलेल्या प्रवाशांना पाणी, अन्न, शौचालय या मूलभूत सुविधा न मिळाल्यानं त्यांचे हाल होत आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे का बंद ?

पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा प्रोपिलीन गॅस ने भरलेला टँकर आडोशी टनलजवळील उतारावर वेगात असताना चालकाचा ताबा सुटला आणि तो पलटी झाला. टँकरमधून अत्यंत ज्वलनशील प्रोपिलीन गॅसची गळती सुरू झाल्याने सुरक्षा कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. नंतर काही वेळाने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली, ज्यामुळे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

अपघातानंतर गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळ (MSRDC) यांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस गळती नियंत्रणात आणण्याचे आणि टँकर हटवण्याचे प्रयत्न रात्रीभर सुरू होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

वाहतूक ठप्प झाल्यानं कोणत्याही प्रकारची सुविधा न मिळाल्यान प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. "रात्रभर अडकून पडलो, पाणी-खाणे काहीच नव्हते. टोल वसूल करतात पण अशा वेळी मदत कुठे?" असे अनेकांनी म्हटलं आहे. एका प्रवाशाने म्हटले की, "सकाळपर्यंत आम्ही अडकून होतो, व्यवस्थापन अतिशय खराब होते."

MSRDC आणि पोलीस यांनी प्रवाशांना पर्यायी मार्ग (जसे की जुना मुंबई-पुणे महामार्ग) वापरण्याचे आवाहन केले आहे.

सकाळपर्यंत वाहतूक हळूहळू सुरू झाली असून टप्प्याटप्याने वाहने सोडली जात आहेत, परंतु वाहतूककोंडी अजूनही मोठी आहे.

मुंबई-पुणे, पुणे-मुंबई हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक असून, अशा अपघातांमुळे वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच पूर्ण वाहतूक सुरळीत होईल असं सांगण्यात आलं आहे.

Updated : 4 Feb 2026 10:34 AM IST
Next Story
Share it
Top