Home > Top News > Mumbai-Pune Expressway : सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणारा हा द्रुतगती मार्ग कसा तयार झाला?

Mumbai-Pune Expressway : सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणारा हा द्रुतगती मार्ग कसा तयार झाला?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला भारताच्या आधुनिक रस्ते क्रांतीचा प्रतीक का म्हटलं जातं? काय आहे या रस्त्याचे वैशिष्ट्ये? जाणून घ्या...

Mumbai-Pune Expressway : सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणारा हा द्रुतगती मार्ग कसा तयार झाला?
X

Yashwantrao Chavan Expressway महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला, IT इंडस्ट्रीला, लॉजिस्टिक्सला आणि दोन शहरांमधील सामाजिक-सांस्कृतिक देवाणघेवाणीला गती देणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खरचं भारताच्या आधुनिक रस्ते क्रांतीचा प्रतीक आहे का असा प्रश्न गेल्या दोन दिवसात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पडला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणारा हा रस्ता कसा तयार झाला? काय आहे या वेगवान रस्त्याची कहाणी जाणून घेऊयात.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे) हा भारतातील पहिला आधुनिक, नियंत्रित-प्रवेश असलेला (access-controlled), टोल-आधारित (६ पदरी रस्ता) ६-लेन काँक्रीट महामार्ग आहे. हा मार्ग मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांना जोडतो आणि भारतीय रस्ते इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो.

मुंबई (आर्थिक राजधानी) आणि पुणे (सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र) यांच्यातील जुना मार्ग, म्हणजे जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH ४ / NH ४८), ब्रिटिश काळात बांधला गेला होता. १९८०-९० च्या दशकात औद्योगिकीकरण, IT क्षेत्राचा उदय, वाहनांची संख्या प्रचंड वाढली. परिणामी खोपोली, खंडाळा, लोणावळा भागात वाहतूक कोंडी, अपघात आणि ४-५ तास लागणारा प्रवास हा सामान्य झाला होता. यामुळे दोन्ही शहरांमधील आर्थिक आणि व्यावसायिक देवाणघेवाणीवर परिणाम होत होता. या समस्येवर उपाय म्हणून स्वतंत्र, वेगवान आणि सुरक्षित द्रुतगती मार्गाची गरज भासली आणि शाससाने या प्रकल्पाची सुरुवात केली.

१९९० : महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प आखला. केंद्र सरकारच्या RITES (Rail India Technical and Economic Service) संस्थेला feasibility study साठी नेमले गेले.

१९९४ : RITES ने अहवाल सादर केला. अंदाजे खर्च ₹१,१४६ कोटी (त्या काळात) असा अंदाज होता. टोल-आधारित (toll-based) प्रकल्प असावा, असे सुचवले गेले.

१९९७ : प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडे सोपवली गेली. Build-Operate-Transfer (BOT) तत्त्वावर ३० वर्षांसाठी टोल गोळा करण्याचा निर्णय घेतला गेला.

१९९८ : प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. चार वेगवेगळ्या कंत्राटदारांना कामाचे टुकडे देण्यात आले.

२००० : पहिले काही टप्पे (विशेषतः खंडाळा-लोणावळा भागातील बोगदे) वाहतुकीसाठी खुला झाला.

एप्रिल २००२ : संपूर्ण मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास गेला.

या महामार्गाची लांबी : ९४.५ किमी, रचना : ६ लेन (सहा पदरी) (प्रत्येक दिशेला ३ लेन), पूर्णपणे काँक्रीटचा, access-controlled (फक्त नियंत्रित प्रवेश-निकास बिंदू)

विशेष रचना : भारतातील पहिले लांब बोगदे खंडाळा टनल आणि मालवली टनल (प्रत्येकी सुमारे १ किमी लांब). हे बोगदे drilling & blasting पद्धतीने बांधले गेले.

खर्च : अंदाजे ₹१,६३० कोटी करण्यात आला.

प्रवास वेळ : जुना मार्गावर ४-५ तास लागत असताना, एक्सप्रेसवेवर फक्त २-२.५ तासांत मुंबई-पुणे प्रवास शक्य झाला. परंतु सध्याची परिस्थिती पाहता किती वेळ लागेल यांचा अंदाज नाही.

प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुरुवातीला फक्त "मुंबई-पुणे एक्सप्रेसवे" म्हणून ओळखला जायचा. नंतर २००९ मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात आले. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग.

हा मार्ग भारतातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. दररोज लाखो वाहने (खासगी कार, बस, ट्रक) याचा वापर करतात. आज (२०२६ पर्यंत) हा मार्ग अजूनही विस्तार आणि सुधारणांच्या प्रक्रियेत आहे. मिसिंग लिंक प्रकल्प, १०-लेन विस्तार, आणि बोरघाट भागातील सुधारणा यासारख्या योजना सुरू आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने प्रवासाचे अंतर जरी कमी केले तर मानवनिर्मित्त संकटांचं व्यवस्थापन योग्यरित्या केले नसल्यानं वाहतूक कोंडीचा सामान करावा लागतो.

Updated : 5 Feb 2026 6:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top