Home > News Update > शासन आपल्या दारी उपक्रमामुळे बीड जिल्ह्याच्या आशा पल्लवीत होणार

शासन आपल्या दारी उपक्रमामुळे बीड जिल्ह्याच्या आशा पल्लवीत होणार

शासन आपल्या दारी उपक्रमामुळे बीड जिल्ह्याच्या आशा पल्लवीत होणार
X

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 5 डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात अनेक विकासकामांचे भूमिपूजन करून त्यांचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमात काही नवीन प्रकल्पांची घोषणा होणार असल्याने वर्षानुवर्षे दुष्काळाशी झुंजणाऱ्या बीड जिल्ह्याच्या आशा पल्लवीत होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कामांचा होणार शुभारंभ

परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसीचे भूमिपूजन

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 286 कोटी 68 लाख रुपयांच्या आराखड्याचे भूमिपूजन

सोयाबीन संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय या तीन शासकीय संस्था उभारणीच्या सुमारे 311 कोटींच्या कामांचे भूमिपूजन

बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या 61 कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन

परळी शहर बसस्थानकाच्या सुधारित कामाचे भूमिपूजन

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सिरसाळ्यात उभारण्यात आलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे लोकार्पण

बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना विविध योजनेतील लाभाचे थेट वाटप

शासकीय कार्यक्रमाच्या अगोदर होणार अभूतपूर्व स्वागत

शासकीय कार्यक्रमास सुरुवात होण्या अगोदर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात प्रथम आगमनानिमित्त सर्व मान्यवरांच्या अभूतपूर्व स्वागत रॅलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आले आहे.

या रॅलीसाठी संपूर्ण परळी शहर दिवाळी सारखे सजविण्यात आले असून या रॅलीत महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

मणिपूर, केरळ, तिरुपती बालाजी, आंध्र प्रदेश, पंजाब, मुंबई आदी सहा ठिकाणावरून खास बँड पथक पाचारण करण्यात आले आहेत. तसेच पुष्पवृष्टी व रोषणाईद्वारे अभूतपूर्व स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. या रॅलीचा शेवट मौलाना आझाद चौकात होईल.

असा असेल मुख्य कार्यक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह सर्व मान्यवर सुरुवातीला गोपीनाथगड (पांगरी) येथे येणार असून त्याठिकाणी ते लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतील व त्याठिकाणी 286.68 कोटी रुपयांच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे भूमिपूजन करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांना वंदन केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन आयोजित स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅली नंतर थेट कार्यक्रम स्थळी वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदान येथे येतील व मुख्य शासकीय कार्यक्रमास सुरुवात होईल. समोरील मैदान येथे येतील व मुख्य शासकीय कार्यक्रमास सुरुवात होईल.


Updated : 4 Dec 2023 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top