मैत्रेय ठेवीदारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं
X
राज्यासह देशभरातील सुमारे २० लाख ठेवीदारांकडून २१०० कोटींची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाची स्थिती नेमकी काय आहे ? हे अजूनही गुंतवणूकदारांना ठाऊक नसल्यामुळे ठेवीदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी येथील १६ ठेवीदारांनी थेट पंतप्रधान, केंद्रीय गृहसचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याने या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्या-वर्षांपासून संपूर्ण राज्यात कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीचे प्रकरण गाजत आहे.
जिल्ह्यातील मध्यमवर्गीयांनी कमाईतील रक्कमेचा काही हिस्सा बचत म्हणून मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड कंस्ट्रक्शन प्रा.लि., मैत्रेय रिएक्टर्स अॅण्ड कंट्रक्शन प्रा.लि.,या कंपनीचा जळगाव शाखेत ठेवली होती. या ठेवीची मुदत संपल्यानंतर कंपनीकडून कुठल्याही स्वरूपाचा परतावा देण्यात आला नाही. ठेवीच्या रक्कमेसाठी कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता केली असून, अद्याप रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना ई-मेलद्वारे पाठवली असून,याची दखल घेत केंद्रीय गृहसचिवांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्याचे गृह विभाग,वित्त विभाग तसेच सामाजिक न्याय विभाग यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा...
‘गाडीचे स्टिअरिंग’ कुणाच्या हाती?
किरण बेदींना कोवीड-19 मंत्रालय? काय आहे सत्य?
राज्यात 24 तासात पुन्हा 9 हजारांच्यावर रुग्ण
“राजस्थानात राष्ट्रपती राजवट लागू करा”
वर्षा मुधूसुदन सत्पाळकर यांनी स्थापन केलेल्या मैत्रेय समुहाने १२ वर्षात हॉटेल, रिसॉटस्, गृहप्रवेश उभारून तसेच दरम्यान, मैत्रेय कंपनीला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे राज्यातील हजारो गुंतवणूकदार/ठेवीदार आकर्षित झाले, केले गेले. २०१५ पूर्वी मैत्रेयने ग्राहकांच्या ठेवी वेळेच्या वेळी चोख करत केल्या. परंतु, जुलै २०१५ नंतर कंपनीने परतावा दोन महिने उशिरा देणे सुरू केले. त्यानंतर मात्र, त्यांच्या गुंतवणूकीचा परतावा न देता त्यांना हजारों कोटींचा गंडा घातला.
गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे तर नाहीच, शिवाय मुद्दलही मिळत नसल्याने ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली.या प्रकरणात फसवणुकीबद्दल राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर मैत्रेय कंपनीचे सर्व कार्यालये बंद पडली. जळगाव जिल्हातील हजारो नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये कोट्यावधीची गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात फक्त नाशिक जिल्ह्यात मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना दीड कोटी वाटप झाले.
या प्रकरणातील फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली गुंतवणूक ठेवीची रक्कम दिली जाणार आहे. असे सांगण्यात आले होते. तसेच ज्या गुंतवणूकदारांनी तक्रार केली नसेल. त्यांनी जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनला पॉलिसीची माहिती नमुन्यात भरून ती पेन ड्राईव्हमध्ये भरून आणावी. असे आवाहन गुंतवणूकदारांना प्रशासन तसेच कंपनीच्या वतीने करण्यात आले होते.
जळगाव जिल्ह्यातील वर्डी येथील गुंतवणूक तक्रारदार शांताराम जयसिंग कोळी, इंदूबाई मच्छिंद्र धनगर, राजेंद्र पुरुषोत्तम सुतार, राधाबाई महारू पाटील, उषाबाई प्रताप धनगर, हिलाल शिवराम पाटील, राजेंद्र अमृत सोनवणे, सुरेश अभिमन धनगर, रंजनाबाई पांडुरंग पाटील, पुरूषोत्तम अभिमन धनगर,आनंदा रामदास धनगर, रुख्याबाई नारायण बागुल, विजुबाई राजेंद्र पाटील, कल्पना राजेंद्र मिस्तरी, तुकाराम अमृत कुंभार, रविंद्र मच्छिंद्र धनगर.
मधुसूधन सत्पाळकर यांनी १९९८ मध्ये मैत्रेय सर्व्हिसेस नावाची कंपनी विरार येथे स्थापन केली. सत्पाळकर हे चेअरमन तथा कार्यकारी संचालक होते. तर पत्नी वर्षा सत्पाळकर या संचालक होत्या. २००४ मध्ये मधुसूदन सत्पाळकर यांचे निधन झाले. त्यामुळे या कंपनीचा पदभार पत्नी वर्षा यांनी सांभाळला. भाऊ जनार्दन परूळेकर यालाही त्यांनी संचालक केले. ही कंपनी स्थापन करण्यापूर्वी मधुसूदन सत्पाळकर हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. २००८ मध्ये मैत्रेय कंपनी बंद पडली. त्यानंतर वर्षा सत्पाळकर व परूळेकर यांनी मैत्रेय प्लॉटर्स व स्ट्रक्चर्स नावाने दुसरी कंपनी स्थापन केली. नंतर २०१३ मध्ये ही कंपनीही बंद झाली.
या कंपनीत लोकांचे अडकलेले पैसे परत करण्यासाठी वर्षा सत्पाळकर यांनी पुन्हा मैत्रेय रिएल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन या नावाने तिसरी कंपनी स्थापन केली. त्यात परूळेकर यांच्याऐवजी सत्पाळकर यांनी अजित पाठारे व ज्ञानेश्वर वैद्य (दोन्ही रा.विरार) या दोघांना संचालक बनविले. ही कंपनी सुरू असतानाच यासारखीच बंगळूरू येथे २०१५-१६ मध्ये सुवर्णसिध्दी नावाची चौथी कंपनी सुरू केली. त्यात लक्ष्मीकांत नार्वेकर व विजय तावरे (दोन्ही रा.विरार) यांना संचालक केले.
मात्र, या कंपनीने लोकांकडून घेतलेले पैस परत न दिल्यानं अनेक लोकांचे संसार उद्वस्थ होण्याची वेळ आली आहे.