Home > News Update > मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे; अर्थमंत्री म्हणून अजित पवार निर्णय घेतील : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे; अर्थमंत्री म्हणून अजित पवार निर्णय घेतील : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे;  अर्थमंत्री म्हणून अजित पवार निर्णय घेतील : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
X

मुंबईत 12 ऑक्‍टोबर रोजी अचानक वीज गायब झाली होती त्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री मुंबईतील विविध ऊर्जा उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या प्लांट ला भेट देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी ट्रॉम्बे येथे असलेल्या टाटा पॉवरच्या प्लांट ला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. नुकतेच मी कळवा येथे भेट दिली, आज टाटा पॉवर आणि उद्या अदानी पॉवर ला भेट देणार आहे..

"राज्यातील वाढीव वीजबिलासंदर्भात आम्ही सात वेळा रिपोर्ट पाठवला आहे. त्यासाठी अर्थखात्याला फाईल दिली आहे. येत्या दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल," असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

"आम्हाला मातोश्रीवरुन फोन आला आहे. त्यामुळे वीज बिलासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ. यााबाबतची फाईल वित्त विभागाकडे गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी होते. पण आता ते बरे झाले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेऊ," असेही नितीन राऊत यांनी सांगितले. "0 ते 100 युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे. मात्र त्यावर अर्थमंत्री म्हणून अजित पवार बोलतील. तसेच माझ्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच मी त्यावर आणखी योग्य भाष्य करेन. यंदा दिवाळीत नागरिकांना नक्कीच सप्रेम भेट मिळेल," अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.

मुंबईकराना प्रीमियम वीज देण्याचा मानस

"राज्याचे ऊर्जा खातं माझ्याकडे आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात 0 ते 100 युनिटपर्यंत फ्री वीज पुरवठा केला जाईल. आम्ही वीज उत्पादन शुक्ल कमी करु. तसेच आमच्या तीन कंपन्यांमध्ये अॅडवान्स टेक्नॉलॉजी आणू. जवळपास 4 तास तरी शेतकऱ्यांना कुठलाही अडथळा न येता वीज पुरवठा केला जाईल. तसेच अनेक ठिकाणी आम्ही सोलार पॅनलला प्राधान्य देत आहोत," असेही नितीन राऊत यांनी सांगितले.

"यासाठी आम्ही अनेक MOU साईन केले आहेत. मात्र आपले वीजदर पाहून अनेक इंडस्ट्री येत नाही. मुंबईला वीज पुरवण्यासाठी टाटा कंपनी पुढे आली आहे. हे टाटा युनिट मल्टिपल युनिट आहेत. मुंबईकराना प्रीमियम वीज देण्याचा मानस 1 वर्षात पूर्ण होईल," असेही नितीन राऊतांनी सांगितले.

मुंबईत वीज गायब प्रकरणी तांत्रिक समिती अहवाल सादर

"गेल्या 12 ऑक्टोबरला मुंबई अंधारात का गेली? त्याचा कारणांचा शोध घेण्यासाठी मी हा दौरा करत आहे. माझ्या खात्याची समिती सुद्धा याबाबत टेक्निकल गोष्टीचा शोध घेत आहे, यापुढे मुंबईकरांवर अशी वेळ येणार नाही. येत्या 2030 पर्यंतचा माईल स्टोन ठेवला आहे की वीज पुरवठा आणखी कशाप्रकारे वाढू शकतो. मुंबईला 24 तास वीज सातत्याने खात्रीची कशी देता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेत," असेही ते यावेळी म्हणाले.

"मी वीज गायब झाल्याने शंका व्यक्त केली होती. त्यावर तांत्रिक समिती अहवाल काल आला आहे. तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल. तसेच मी जी तांत्रिक समिती नेमली होती, त्याचा अहवाल येणे बाकी आहे." असेही नितीन राऊतांनी यावेळी सांगितले.

दहा वर्षात मुंबईकरांना पाच हजार मेगावॉट वीज

मुंबईत १० हजार मेगावटची ट्रान्समिशन ची व्यवस्था आहे. मात्र पुढील दहा वर्षात म्हणजेच २०३० पर्यंत मुंबईला पाच हजार मेगावॉट वीज लागेल, त्यामुळे त्यात वाढ होण्यासाठी उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबईत वीज उत्पादन वाढविण्यासाठी अनेक यंत्रणा या अजून आणि त्याचे आधुनिकीकरण केले जाणार असून त्यासाठी चा कार्यक्रम वर्षभरात पूर्ण केला जाणार आहे यामुळे आता असलेल्या वीज उत्पादन आणि त्यातील कमतरता याचा विषय सुद्धा त्यातून मार्गी लागणार आहे.२३०० मेगावॉट पर्यंत विजेचे उत्पादन वाढवले पाहिजे. चांगल्या दर्जाची वीज आम्ही मुंबईकरांना देणार आहोत.

कृषी उर्जा नवं धोरण आणणार

राज्यातील शेतीला ४ तास शेतीला सलग वीजपुरवठा दिला जाणार आहे आणि त्यासाठीच सरकारकडून लवकरच कृषी उर्जा नवं धोरण आणले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच येत्या काळामध्ये सौर उर्जेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 2 Nov 2020 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top