Home > मॅक्स व्हिडीओ > अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्यावर ७० हजार कोटींचा आरोप करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं !

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्यावर ७० हजार कोटींचा आरोप करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं !

अजितदादांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले नंतर त्यांच्यासोबतच सत्तेत बसले... अजितदादांच्या शोकप्रस्तावानिमित्त कुणाला किती बदनाम करायचं? किती आयुष्यातून उठवायचं? याची मर्यादा प्रत्येकांने पाळली पाहिजे असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्यावर ७० हजार कोटींचा आरोप करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं !
X

Uddhav Thackeray on Ajit Pawar महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र सुन्न झाला. आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाला सुरुवात झाली असून अजितदादा यांच्यावर शोकप्रस्ताव मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजितदादाच्या कामाची पद्धत, शिस्त आणि त्यांच्या आवाज याविषयी भाष्य करताना कोरोना काळातील त्यांची उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. अजिदादांचं जाणं अनेकांना चटका लावणारं आहे. एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख अजिदादांनी निर्माण केली. दादांकडून महाराष्ट्राने अपेक्षा लावलेली असताना त्यांचं अचानक जाणं हा फक्त पवार कुटुंबियांना धक्का नसून संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजिदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करून त्यांना नंतर सत्तेत सामील करून घेणाऱ्यांनाही सुनावलं की, आपण कधी कुणाला किती बदनाम करायचं? किती आयुष्यातून उठवायचं? याची मर्यादा प्रत्येकांने पाळली पाहिजे. माणूस असताना त्याची किंमत नाही आणि गेल्यानंतर त्याच महत्त्व समजून अर्थ नाही असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Updated : 23 Feb 2026 4:26 PM IST
Next Story
Share it
Top