Home > मॅक्स व्हिडीओ > Chhatrapati Shivaji Maharaj : "शिवरायांच्या नावाने धार्मिक ध्रुवीकरण बंद करा,”- प्रा. जावेदपाशा कुरेशी

Chhatrapati Shivaji Maharaj : "शिवरायांच्या नावाने धार्मिक ध्रुवीकरण बंद करा,”- प्रा. जावेदपाशा कुरेशी

शिवरायांचं 'स्वराज्य' समजून घ्या... शिवाजी महाराज आणि टिपु सुलतान यांची तुलना का होते? जाणून घ्या प्रा. जावेदपाशा कुरेशी यांच्याकडून

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या नावाने धार्मिक ध्रुवीकरण बंद करा,”- प्रा. जावेदपाशा कुरेशी
X

Shiv Jayanti छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रा. जावेदपाशा कुरेशी यांनी शिवरायांच्या 'हिंदवी स्वराज्य'ची खरी व्याख्या मांडली. शिवरायांचे संपूर्ण जीवन 'हिंदवी स्वराज्य' स्थापनेसाठी समर्पित होते. हे स्वराज्य केवळ एका धर्माचे किंवा जातीचे नव्हते, तर या भूमीच्या सर्व लोकांचे, विशेषतः शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि बहुजन समाजाचे होते.

प्रा. कुरेशी यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ३५% पेक्षा जास्त सरदार मुस्लीम होते. त्यांचे पहिले परराष्ट्र सचिव मौलाना हैदर (मुस्लिम), पहिले तोफखाना प्रमुख मुस्लीम, आणि प्रसिद्ध चित्रकार मीर मोहम्मद यांनी काढलेल्या शिवरायांच्या जिवंत चित्रात २१ अंगरक्षकांपैकी ८ मुस्लीम होते. महाराजांनी मुस्लीम सैनिकांसाठी मस्जिद बांधली आणि किल्ल्यांची जबाबदारी आदिवासी, शूद्र आणि खालच्या जातींना दिली यात कोणताही भेदभाव नव्हता.

ते पुढे म्हणतात, शिवरायांच्या कुटुंबियांचा वारसा सूफी संत आणि भक्ती परंपरेचा होता. आजोबा मालोजी भोसले आणि वडील शहाजी यांनी सूफी संत शरीफजींची भक्ती केली, तर शिवरायांनी संत तुकाराम आणि सूफी संत याकूत बाबा यांना गुरू मानले. त्यांचे स्वराज्य हे सांस्कृतिक संमिश्रण (syncretic) होते, ज्यात हिंदू आणि मुस्लीम दोघांचाही समान सन्मान होता.

प्रा. कुरेशी यांनी आजच्या राजकीय दुरुपयोगावर टीका केली. शिवरायांना फक्त 'हिंदू राजा' म्हणून सादर करून मुस्लिमविरोधी चित्र रंगवले जाते. टिपू सुलतानशी तुलना करणे चुकीचे आहे (दोघे वेगळ्या काळातील, वेगळ्या भूमिकांचे). धार्मिक ध्रुवीकरणासाठी शिवरायांचे नाव वापरले जाते, जे त्यांच्या समावेशक वारशाला धक्का लावते. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे विशेष कौतुक केले: फुलेंनी रायगडावर शिवरायांची समाधी शोधली, ती स्वच्छ केली, पहिला पोवाडा आणि चरित्र लिहिले. "महात्मा ज्योतिबा फुले जर नसते तर छत्रपती शिवरायांची समाधी सुद्धा आम्हाला मिळाली असती का?" असा प्रश्न ते उपस्थित करतात.

प्रा. कुरेशी म्हणतात : शिवरायांचे स्वराज्य हे संविधानातील मूल्यांशी जुळते समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता. त्यांचे सांस्कृतिक मूल्य इतके मोठे होते की, नमाज पडणाऱ्या मुस्लिमांनीही त्यात आपले अस्तित्व पाहावे. "छत्रपती शिवरायांच्या नावाने धार्मिक ध्रुवीकरण बंद झाले पाहिजे,".

Updated : 19 Feb 2026 2:52 PM IST
Next Story
Share it
Top