अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले BEST CM - देवेंद्र फडणवीस
X
२३ फेब्रुवारी २०२६ आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोक प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानिमित्त (विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर) शोक प्रस्तावानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मित्रशोक' हा हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो अशा शब्दात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला (अजितदादांचं अकाली निधन) धक्का आणि दुःख व्यक्त केले. अचानक आलेली ही बातमी सगळ्यांनाच हादरवून टाकणारी होती. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचे, विशेषतः अर्थमंत्री म्हणून केलेल्या कामाचे विस्तृत वर्णन केले. अजितदादांनी सलग ११ वर्षे बजेट सादर केले, त्यातही सर्वाधिक बजेट सादर करण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. 'लाडकी बहीण' योजनासारखे कठीण निर्णय घेताना त्यांनी महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य दिले.
फडणवीस यांनी वैयक्तिक आठवणींही शेअर केल्या. दोघांचा जन्मदिवस २२ जुलै असल्याने आणि २०१४ पासून जवळचे मैत्र असल्याने त्यांच्यातील नाते खूप घट्ट होते. शेवटची भेट २७ जानेवारी २०२६ रोजी झाली होती. अजितदादांची वेळेची पाळण, काम करण्याची तळमळ, शेतीविषयक प्रगल्भ ज्ञान, ग्राउंड लेव्हलपासून राजकारणात येऊन पक्षाची उभारणी केलेली मेहनत या सगळ्यांचा उल्लेख करताना फडणवीस यांचा आवाज ओलसर झाला. २०१९ मध्ये सरकार स्थापनेच्या वेळी आणि नंतरच्या काळात अजितदादांनी केलेली मदत, विकासकामांसाठी दिलेली साथ, निर्णय घेताना कधीही अहंकार न दाखवता माफी मागण्याची तयारी, आणि सहकार, शिक्षण, उद्योग क्षेत्रात केलेले योगदान या सगळ्यांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले,
"अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले बेस्ट सीएम होते."
त्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांना, विशेषतः त्यांच्या पत्नी व मुलांना धीर दिला आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना केली. अजित पवार हे फक्त एक राजकारणी नव्हते; ते एक कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले नेते' होते. महाराष्ट्राने एक मोठा आधार गमावला आहे. पण त्यांच्या कार्याचा वारसा कायम राहील. अजितदादांच्या नावाने महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक पानांवर सोनेरी अक्षरांनी नोंद होईल.






