Manusmriti and women : मनुस्मृतीत स्त्रियांविषयी काय लिहिलंय ?
X
२५ डिसेंबर १९२७ रोजी महाराष्ट्रातील महाड येथे Dr. Babasaheb burn Manusmriti डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृतीची प्रत सार्वजनिकपणे जाळण्यात आली. हे कृत्य केवळ एका प्राचीन ग्रंथाचे दहन नव्हते, तर जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि पितृसत्ताक विरोधातील एक क्रांतिकारी घोषणा होती. विशेष म्हणजे, भारतीय स्त्रीच्या मुक्तीच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मनुस्मृतीत स्त्रियांची स्थिती अत्यंत दास्यपूर्ण आणि भेदभावपूर्ण स्वरूपात मांडली गेली आहे.
मनुस्मृतीत नेमकं काय लिहिलंय स्त्रियांविषयी? Manusmriti and women
मनुस्मृती (इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २०० दरम्यान रचली गेलेली) ही हिंदू धर्मशास्त्रातील प्रमुख संहिता आहे, जी वर्णव्यवस्था आणि सामाजिक नियमांची रूपरेषा आखते. मात्र स्त्रियांच्या बाबतीत ती अत्यंत भेदभावपूर्ण आणि दमनकारी आहे.
काही प्रमुख तरतुदी :
आयुष्यभर पुरुषांवर अवलंबित्व : बालपणी वडील, तरुणपणी पती आणि विधवावस्थेत पुत्रांच्या संरक्षणात राहणे बंधनकारक; स्वतंत्र राहणे निषिद्ध (अध्याय ९, श्लोक ३ ; अध्याय ५, श्लोक १४८).
पतीला देवासमान मानणे : पती व्यसनी, परस्त्रीगामी किंवा गुणहीन असला तरी त्याची पूजा करावी (अध्याय ५, श्लोक १५४).
स्त्रियांचा स्वभाव दोषपूर्ण : स्त्रियांना अस्थिर, क्रोधी, दुष्ट आणि विश्वासघातकी म्हटले आहे (अध्याय ९, श्लोक १७).
संपत्ती आणि शिक्षणावर निर्बंध : संपत्तीचा वारसा मर्यादित, वेदाध्ययन निषिद्ध आणि धार्मिक अधिकार कमी.
डॉ. आंबेडकरांचा विरोध आणि स्त्रीमुक्तीचा वारसा Dr. Babasaheb Ambedkar ideology
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीला 'असमानतेचे पुस्तक' म्हटले आणि तिला ब्राह्मणवाद-पितृसत्तेचा आधारस्तंभ म्हटलं. मनुस्मृती दहन हे दलित व स्त्री मुक्तीचे प्रतीक असून स्त्री स्वातंत्र्याची कवाडं उघडण्याची चावी होती. त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना संपत्ती, घटस्फोट आणि विवाहाचे समान अधिकार दिले, जे मनुस्मृतीच्या थेट विरोधात होते. आजही ग्रामीण भागात मनुस्मृतीच्या प्रभावामुळे खाप पंचायतींमध्ये स्त्रियांवर अन्याय होतात. मात्र डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे स्त्रियांना मूलभूत समान अधिकार देऊन त्यांना व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार दिला. सध्याच्या काळात ज्या काही स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उच्च पदावर आहेत ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे.






