MPSC परीक्षा: आता 'ती' चं लग्न होणार….
राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत MPSC ची परीक्षा पुन्हा एकदा काही काळ पुढं ढकलली आहे. मात्र, ही परीक्षा पुढं ढकलल्यानं MPSC ची परीक्षा देणाऱ्या मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल? वाचा लेखक श्रीरंजन आवटे यांचं विश्लेषण
X
"एक परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलली म्हणून फार काही आभाळ कोसळत नाही", एक मित्र म्हणाला. मित्राला असं वाटणं साहजिक आहे, कारण तो बिचारा आहेच पुण्याचा. स्पर्धा परीक्षा असो किंवा साधं शिक्षण, पोरी आईबापांना, नातेवाईकांना पटवून देतात की, एक वर्ष तरी शिकू दे. मग पुढच्या वर्षी लग्न करू वगैरे. आता तर लॉकडाऊनमध्ये पोरींचा 'भार' स्वस्तात हलका करण्याची जणू संधीच आहे. त्यामुळे मुलींवर लग्नासाठी अधिक दबाव आणला जात आहे.
लग्नानंतर आपल्या संधींचा सारा अवकाश हिरावला जाणार याची कित्येक मुलींना खात्रीच असते. (बालविवाहांचं प्रमाणही लक्षणीयरित्या वाढलं असल्याचं अलीकडे नोंदवलं गेलं आहेच.) अशा परिस्थितीत स्वतःसाठी एक चान्स, एक अटेम्प्ट हट्ट करून ती मागते, एखादं वर्ष उसनं मागते आणि धडपडते. तेव्हा किमान वेळच्या वेळी परीक्षा पार पाडल्या जाणं, त्यांचे निर्दोष निष्पक्ष निकाल लागणं आणि कोर्टकचेऱ्याच्या फे-यांऐवजी जलद गतीनं नियुक्त्या होणं. या बाबी तरी धड व्हायला हव्यात.
एक परीक्षा पुढं जाते तेव्हा कित्येकींची स्वप्नं कोमेजून जातात. (इतर परिणाम वेगळेच.) म्हणूनच सार्वजनिक ध्येयधोरणांबाबत ठरवताना,निर्णय घेताना साकल्याने विचार करण्याची आवश्यकता असते. MPSC Examबाकी एकूणात सामाजिक धारणा बदलण्यासाठीची लढाई तर फार मोठी आहे.






