Home > Politics > जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका

जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका

जितेंद्र आव्हाड  यांच्या जीवाला धोका
X

नेहमीच चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. औरंगजेबाबाबत केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

गेल्या काही दिवसात महापुरुषांबद्दल वक्तव्यं करुन राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. औरंगजेबाच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानं आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. गृहविभागाने जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता जितेंद्र आव्हाडांच्या जीवाला धोका असल्याचं गृहविभागाने म्हटलं आहे. राज्यभर दौऱ्यावर असताना आव्हाडांच्या दौऱ्यात अधिक सुरक्षा तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

'औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता' विधानामुळे वाद "छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं.

तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो," असं जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलताना होते. याच विधानावरुन वाद निर्माण झाला असून एका बाजूला विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या संभाजी महाराजांच्या वक्तव्यावरुन भाजपचे आंदोलन सुरु आहे.

Updated : 3 Jan 2023 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top